लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभात आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

आंध्र प्रदेशच्या गोदावरी पूर्व जिल्ह्यात एक लग्न समारंभ होता. या समारंभात चार मुलं आली होती. खेळता खेळता मुलं बाहेर गेली आणि एका बेवारस गाडीत जाऊन बसली. अचानक ही गाडी लॉक झाली. या गाडीत या मुलांना श्वास घेता येत नव्हता. त्यातच या मुलांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला मुलं दिसली नाही म्हणून त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांचा शोध घेतल्यानंतर ही मुलं गाडीत सापडली. पण तेव्हा फार उशीर झाला होता. सर्व मुलं ही 6 ते 8 वर्षांची होती. त्यात एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;