लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभात आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

आंध्र प्रदेशच्या गोदावरी पूर्व जिल्ह्यात एक लग्न समारंभ होता. या समारंभात चार मुलं आली होती. खेळता खेळता मुलं बाहेर गेली आणि एका बेवारस गाडीत जाऊन बसली. अचानक ही गाडी लॉक झाली. या गाडीत या मुलांना श्वास घेता येत नव्हता. त्यातच या मुलांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला मुलं दिसली नाही म्हणून त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांचा शोध घेतल्यानंतर ही मुलं गाडीत सापडली. पण तेव्हा फार उशीर झाला होता. सर्व मुलं ही 6 ते 8 वर्षांची होती. त्यात एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यातच आता हे युद्ध थांबवल्याबाबत नोबेल पारितोषिक मिळावे,...
शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले
Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू
एअर इंडियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेना; 9 कोटी खर्च करून उभारलेल्या लॅबमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटाच रिकव्हर होईना
इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात
हिंदुस्थानात बनवणार फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ