बिबट्याचं कुटुंब रंगलंय संजय गांधी उद्यानात, नवीन सर्वेक्षणात 54 बिबटे आढळले

बिबट्याचं कुटुंब रंगलंय संजय गांधी उद्यानात, नवीन सर्वेक्षणात 54 बिबटे आढळले

बोरीवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे एक चमत्कार मानला जातो. जगातल्या कुठल्याच शहरी वस्तीपासून जवळ असलेल्या जंगलात बिबट्यांचा अधिवास नाही. येथे बिबटे आहेत म्हणजे बिबट्यांना शिकार करण्यासाठीची अन्न साखळी असणारे हे समृद्ध जंगल आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यान (SGNP) आणि शेजारच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य (TWLS) परिसरातील बिबट्यांची संख्या मोजण्यात आली. त्यात मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यान आणि लगतच्या परिसरात 54 बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे.

बोरीवलीचे संजय गांधी उद्यानातील बिबटे आणि या शहरातील माणसे यांच्या अनोख्या सहजीवनाची कहाणी जगावेगळी आहे. या परिसरातील बिबट्यांची संख्या मोजण्यात आली आहे. SGNP, आरे दुग्ध वसाहत परिसर आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये करण्यात आलेले हे सर्वेक्षण फेब्रुवारी ते जून २०२४ दरम्यान पार पडले आहे. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात ५७ ठिकाणी आणि तुंगारेश्वर परिसरात ३३ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.

या संपूर्ण अभ्यासात वन विभागाचे कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आणि बिबट्यांच्या गणतीसाठी विशेष प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात आली होती. सर्वेक्षणात 54 बिबट्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 36 मादी आणि 16 नर होते तसेच 2 बिबट्यांचे लिंग निर्धारण होऊ शकले नाही. याव्यतिरिक्त चार पिल्लांचीही नोंद झाली आहे. तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात तीन प्रौढ नर बिबट्यांची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे 2015 मध्ये प्रथमच कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपल्या गेलेल्या तीन मादी 2024 मध्ये पुन्हा एकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसल्या आहेत.याचाच अर्थ मागील नऊ वर्षांहून अधिक काळापासून त्या संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानात राहत आहेत. कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्यांबरोबरच चितळ, सांबर, रानमांजर, पाम सिव्हेटसारखे सस्तन प्राणी तसेच पिसूरी ( माऊस डीअर ) आणि रस्टी स्पॉटेड कॅटसारख्या दुर्मिळ प्रजातीही आढळल्या आहेत.

9 किमी अंतर पार करून बिबट्या वसई किल्ल्यात

या अभ्यासादरम्यान एक विशेष घटना नोंदवली गेली आहे. बिबट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या आव्हानांची यातून मुंबईकरांना कल्पना येऊ शकते. प्रथम तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेला एक नर बिबट्या सुमारे 9 किलोमीटर अंतर पार करून घनदाट मानवी वस्त्या, महामार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडून वसई किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेतून या बिबट्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमता दिसून येते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात