संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती, ‘जय जय स्वामी समर्थ’चा महारविवार विशेष भाग
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 4 मे रोजी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा महारविवार विशेष भाग पहायला मिळणार आहे. धनाने सर्व काही विकत घेता येतं का? संकटसमयी संपत्ती माणसाला तारू शकते का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना एका अध्यात्मिक प्रवासाची कथा प्रेक्षक अनुभवणार आहेत.
एका श्रीमंत, गर्विष्ठ व्यापाऱ्याचा अहंकार स्वामी कसा तोडून काढणार आणि कसं उत्तर मिळणार हे प्रेक्षकांना या भागात पहायला मिळणार आहे. जेथे पुण्य आणि धन यांची खरी किंमत तपासली जाईल.
स्वामी समर्थांकडे एक भयभीत मंगलदास येतो. त्याचा चमत्कारिक मृत्यू झाला आहे आणि तो जीवनदानासाठी आर्जव करतो. स्वामी त्याला एक अट घालतात "संपत्तीचा त्याग करून गोरगरिबांसाठी वाटप कर."
दुसरीकडे, एक अलौकिक तराजू एका बाजूला शांत, स्थिर, तेजस्वी स्वामी बसलेले आणि दुसऱ्या बाजूला मंगलदास एकेक सोन्याच्या भांड्यांनी वजन भरत आहे. पण त्या संपत्तीचा भार स्वामींच्या तेजस्वित्वाशी मुळीच तोंड देऊ शकत नाही. गावकरी अवाक् होऊन हे दृश्य पाहत असतात आणि अखेर त्याची संपत्ती संपते. पण पुण्य संपत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List