गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार 

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार 

गिरणी कामगारांचा त्याग लक्षात घेता घराच्या प्रश्नावर बंद गिरण्या किंवा अन्य पर्यायावर विचार व्हावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने बोलावण्यात आलेल्या कामगार आणि वारसांच्या बैठकीत अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी 1 मे पर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर एल्गार आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगार संघटना नेत्यांसह संबंधितांचीही तातडीने बैठक बोलावून गिरणी कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्याबाबत एनटीसीसोबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती, ‘जय जय स्वामी समर्थ’चा महारविवार विशेष भाग संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती, ‘जय जय स्वामी समर्थ’चा महारविवार विशेष भाग
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 4 मे रोजी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा महारविवार विशेष भाग पहायला मिळणार आहे. धनाने...
Raid 2 Review: कॉमन मॅनची पैसा वसूल कहाणी; अजय देवगणवर भारी पडला रितेश देशमुख
खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचा अनुभव आला का? रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला..
उन्हाळ्यात पपई खावी की नाही? त्याचे फायदे – नुकसान जाणून घ्या
रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या
उन्हाळ्यात दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या
अभिनेत्री छाया कदम यांची वनविभागाकडून चौकशी; रानडूक्कर, साळिंदर आणि घोरपड सारखे प्राणी खाल्ल्याचा केला होता दावा