देशभरात उष्णतेचा प्रकोप, राज्यात अवकाळीचा अंदाज; उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता

देशभरात उष्णतेचा प्रकोप, राज्यात अवकाळीचा अंदाज; उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता

देशभरात उष्णतेचा प्रकोप दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेने आतापर्यंतचे विक्रम मोडले असून राजधानी दिल्लीत कालचा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. मात्र, राज्यात ढगाळ वातावरणामुळे काल तापमानात थोडीशी घट झाली आहे. आता आठवडाभर राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून त्यामुळे राज्यातील जनतेने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ऐन ऊन्हाळ्यात अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कायम आहे. गेल्या आठवड्यात विदर्भाला वाढत्या तापमानामुळे चटके बसत होते. मात्र, आता विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून सोमवारी अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, यासह ताशी 50 ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाडा जाणवणार आहे. मात्र, येत्या आठवड्यात वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

उष्णतेच्या लाटेने त्रस्त असलेल्या दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानात 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे. या काळात, गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. या बदलामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे 28 एप्रिलपासून उत्तर प्रदेशातील हवामान बदलणार आहे. या काळात, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा… विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत...
शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख; पण नक्की कारण काय?
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक
हाय कोलेस्ट्रोलची समस्या झटक्यात दूर होईल, पतंजलीचे हे औषध खायला सुरुवात करा; रिसर्चमध्ये दावा
Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार
Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
नागरिकांनो सावधान! पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी अधिकारी भासवून करतेय फोन, वाचा सविस्तर माहिती