Pahalgam Terror Attack – अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म; पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांचं विधान

Pahalgam Terror Attack – अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म; पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांचं विधान

अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त करत ते असं म्हणाले आहेत.

मोहन भागवत म्हणाले की, “रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. देवाने त्याला मारले. ही हिंसा नाही तर अहिंसा आहे. अहिंसा हा आपला धर्म आहे, पण अत्याचार करणाऱ्यांना धर्म शिकवणे ही अहिंसा आहे. आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांना नुकसान पोहोचवत नाही. यानंतरही जर कोणी चुकीचा मार्ग स्वीकारला तर, प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. राजा आपले काम करेल.”

भागवत म्हणाले, “हा हल्ला म्हणजे धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले आणि त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हा आपला स्वभाव नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीत नाही, पण शांतपणे नुकसान सहन करणे हे देखील आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या हृदयात वेदना आणि राग आहे. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.” ते म्हणाले, “रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्याचाही वध करण्यात आला होता. कोणताही पर्याय उरला नव्हता. रामाने त्याला मारले, पण त्यालाही सुधारण्याची संधी देण्यात आली होती.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या! मराठीप्रेमींच्या जाहीर सभेत एकमुखी मागणी पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या! मराठीप्रेमींच्या जाहीर सभेत एकमुखी मागणी
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची किंबहुना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम...
महावितरणकडून ग्राहकांवर अनामत रकमेचा बोजा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तरपत्रिका तपासायला ‘एआय’ची मदत, हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे मिळाले सहकार्य
विदर्भात तापमान पुन्हा 40शी पार
कोकण-मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार
इमारतींचा स्वयंपुनर्विकास मार्गी लावण्यासाठी फायनान्स कॉर्पोरेशनच्या स्थापनेची चाचपणी
देशातील 30 राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर प्रदेशात झाडे उन्मळून पडली