रोह्याच्या तांबडीतील अत्याचार व हत्या प्रकरण- पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रोह्याच्या तांबडीतील अत्याचार व हत्या प्रकरण- पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रोह्याच्या तांबडी येथे चार वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या या घटनेतील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती केली असताना आरोपींची सुटका झाल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.

रोहा तांबडी येथे 26 जुलै 2020 मध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रायगडसह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. प्रकरण घडल्यानंतर रोहा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून चोवीस तासात अटकही केली. शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी माणगाव सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंगळवारी आक्रोश मोर्चा
आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे. तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो, असा संताप तांबडीतील गावकऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान शनिवारी सकाळी रोहा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत पीडितेच्या नातेवाईकांसह बहुजन समाजाने हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचे सांगत 13 मे रोजी रोहे पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त एक हजार किलो डाळिंब वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या...
नॅशनल पार्कमधील रहिवाशांची बाजू ऐकून घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात अपयश; बांगलादेशी महिलेला हायकोर्टाकडून जामीन
जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे
सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी
आता कुरापत काढाल तर तडाखा देऊ! तिन्ही दलांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला ठणकावले