कार्य कोणतेही असो, ‘बिचुकले’त दिला जातो पर्यावरणाचा संदेश; गावाची पंचक्रोशीत होतेय चर्चा

कार्य कोणतेही असो, ‘बिचुकले’त दिला जातो पर्यावरणाचा संदेश; गावाची पंचक्रोशीत होतेय चर्चा

जिल्ह्यात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवणारे गाव अशी वेगळी ओळख असलेले कोरेगाव तालुक्यातील ‘बिचुकले गाव’ सध्या वेगळ्या उपक्रमामुळे पंचक्रोशीत चर्चेत आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे संतुलन राखा’ असा संदेश देण्याचे काम हे गाव सध्या वेगळ्या प्रकारे करत आहे.

गेल्या काही वर्षांपासून बिचुकले गावात शुभकार्य असो की अगदी मृत्यूनंतरचे विधी असो नातेवाईक, भाऊबंद, सुवासिनींना भेटवस्तू देण्याऐवजी आता फळझाडांची रोपे देऊन हे विधी पार पाडण्याचे काम केले जात आहे. केवळ झाड देणं एवढंच न करता पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मृत व्यक्तीच्या अस्थी पाण्यात न सोडता त्या शेतात झाड लावण्याच्या ठिकाणी विधिवत विसर्जन करून त्या जागेवर झाड लावून ते ‘आठवण’ म्हणून जोपासण्याचे काम केलं जात आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील काही वर्षी शासनाच्या जलयुक्त शिवार या उपक्रमातून गावाने मोठे काम केले. केवळ शासकीय योजनाच नव्हे तर सर्वांसाठी काही ना काही उपक्रम हे गाव सतत राबवत आहे.

परगावी शाळेसाठी जाणाऱ्या मुलींसाठी या गावाने सायकल बँक सुरू केली, ज्यामुळे या मुली आता सहजपणे शिक्षणाचे धडे घेत आहेत. यापूर्वी या गावाने ‘विधवा सन्मान योजना’ सुरू केली. यामध्ये सर्व विधीकार्यात विधवांना विधवा न समजता सुवासिनी म्हणून मान देण्यात आला.

गावातील पद्मा रामचंद्र पवार यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या बाराव्यानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने खांदेकरी आणि सुवासिनींना भांडी न देता आंब्याची रोपे देण्यात आली. यामुळे झाडांच्या स्वरूपात मृत व्यक्तीची आठवण चिरंतन राहणार आहे. ही परंपरा गाव अनेक वर्षांपासून जपत आहे.
सिंधू चव्हाण, ग्रामस्थ, बिचुकले

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!