मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं

मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं

घरी मोठ्या मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती. सर्व आनंदात होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला अन् लग्नघर शोकसागरात बुडालं. घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. घरातून धूर निघताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

गुजरातमधील गोधरा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बामरौली रोडवरील वृंदावन 2 सोसायटीत दोषी कुटुंब राहत होते. शेजाऱ्यांनी दोषी यांच्या घरातून धूर येताना पाहिला. त्यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा तोडला. घराच्या पती-पत्नी आणि दोन मुलं बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे. तपासाअंती आगीचे कारण कळेल. काही दिवसातच दोषी यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होणार होता. परंतु तत्पूर्वीच संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर
कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र...
मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं
तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प
100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक
डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट; निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार !
हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य
कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू