मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला

मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला

मी भाजप पक्षाचा भाग नाही हे सांगायला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरीत यायची गरज नव्हती. मुंबईतून जरी सांगितले असते तर मी माझ्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असता, असे भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले.
राजेश सावंत यांची सुकन्या शिवानी सावंत-माने या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यापूर्वी राजेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. बुधवारी रत्नागिरीत महायुतीचा मेळावा झाला त्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजेश सावंत हे भाजपचा भाग नसल्याचे भाषणात सांगितले. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी आपली भूमिका मांडली. राजेश सावंत म्हणाले की, मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला नव्हता. मला जर प्रदेशाध्यक्षांनी फोन करून प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा द्या असे सांगितले असते तर मी तो ही राजीनामा तात्काळ दिला असता. सहा तासांचा प्रवास करून इथे आणून राजेश सावंत भाजप पक्षाचा आता भाग नाही हे सांगायची गरज नव्हती असे राजेश सावंत स्पष्टपणे म्हणाले.

आता मी माझ्या मुलीचा प्रचार करणार

मी आता भाजप पक्षात नाही हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत येऊन जाहीर केल्यामुळे मी आता माझी मुलगी नगराध्यक्षपदाची उमेदवार शिवानी सावंत-माने हिचा प्रचार करायला मोकळा झालो आहे. मी आजपासून शिवानीचा प्रचार करणार असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्लीतील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी
लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटानंतर भीतीचे वातावरण असताना आता नवी दिल्लीत तीन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये...
मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला
बिहारच्या नवीन NDA सरकारमध्ये घराणेशाही, नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी
नेपाळमध्ये पुन्हा एकदा GenZ निदर्शने सुरू, पोलिसांनी विद्याथ्यांवर केला लाठीमार; अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू
Palghar News – शंभर उठाबश्या काढायला लावल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, अखेर सात दिवसांनी शिक्षिकेला अटक
ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
‘350 टक्के टॅरिफची धमकी देऊन…’ हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध विरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा