बिहारच्या नवीन NDA सरकारमध्ये घराणेशाही, नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी

बिहारच्या नवीन NDA सरकारमध्ये घराणेशाही, नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी

बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाली आहे. पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १४ आणि जेडीयू कोट्यातील ८ मंत्र्यांचा समावेश आहे. २६ नवीन मंत्र्यांमध्ये एक मुस्लिम आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले तीन आमदारही मंत्री झाले आहेत. यामध्येच नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यातूनच बिहारच्या नवीन एनडीए सरकारमधील घराणेशाही दिसून आली आहे.

नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात नेत्यांच्या मुला-मुलींनाही संधी दिली आहे. माजी मंत्री आणि नेते महावीर चौधरी यांचे पुत्र अशोक चौधरी यांना जेडीयू कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. नवीन प्रसाद यांचे पुत्र नितीन नवीन यांनाही भाजप कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

यासोबतच जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन आणि उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार अजय निषाद यांच्या पत्नी रमा निषाद यांचाही भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्लीतील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी
लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटानंतर भीतीचे वातावरण असताना आता नवी दिल्लीत तीन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये...
मी भाजमपध्ये नाही हे रत्नागिरीत येऊन सांगायची गरज नव्हती, राजेश सावंत यांचा रवींद्र चव्हाणांना टोला
बिहारच्या नवीन NDA सरकारमध्ये घराणेशाही, नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी
नेपाळमध्ये पुन्हा एकदा GenZ निदर्शने सुरू, पोलिसांनी विद्याथ्यांवर केला लाठीमार; अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू
Palghar News – शंभर उठाबश्या काढायला लावल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, अखेर सात दिवसांनी शिक्षिकेला अटक
ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
‘350 टक्के टॅरिफची धमकी देऊन…’ हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध विरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा