तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प

तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प

तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जल वाहिनी गुरुवारी दुपारी अचानक फुटली. त्यामुळे सुमारे 1200 कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे 1000 मिमीच्या मुख्य जलवाहिनीद्वारे दररोज सुमारे 70 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बोईसर पूर्वेतील वारांगडे परिसरात विराज कंपनीजवळ ही जलवाहिनी फुटली. जमिनीखाली साधारण 10 ते 12 फूट खोल असलेल्या या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडू लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

एमआयडीसी अधिकाऱ्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच तारापूर येथील एमआयडीसीच्या देखभाल आणि दुरुस्ती उपविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र यामुळे तारापूरमधील बाराशे कंपन्यांसह 15 ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये सात ते आठ तास पाणीबाणी निर्माण होणार आहे.

– दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थिती रात्रीपर्यंत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एमआयडीसीतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर
कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र...
मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, तत्पूर्वीच काळाचा घाला; घराला लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबच संपलं
तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प
100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक
डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट; निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार !
हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य
कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू