कल्याण-डोंबिवलीच्या 64 इमारतींचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात, केडीएमसीविरोधात अवमान नोटीस

कल्याण-डोंबिवलीतील 64 बेकायदा इमारतींवर कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमनतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने महापालिकेला नोटीस जारी केली आहे.

या इमारती बेकायदा असल्याचा दावा करत संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचे आदेश असूनही पालिका कारवाई करत नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे, असा आरोप करत संदीप पाटील यांनी पालिकेविरोधात न्यायालयाच्या अवमनतेची याचिका दाखल केली. या याचिकेत माजी आयुक्त यांच्यासह संबंधित विभाग व अधिकाऱयांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत त्या इमारतींनाही प्रतिवादी करा, असे न्यायालयाने पाटील यांना सांगितले आहे. वरील आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली.

दोषींना तुरुंगात टाका

न्यायालयाचे आदेश असूनही बेकायदा इमारती न पाडणाऱ्या संबंधितांना दंड ठोठवावा अथवा तुरुंगाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच कारवाईला कोणामुळे उशीर झाला याचा तपशीलही न्यायालयाने मागवावा, असेही पाटील यांचे म्हणणे आहे.

आदेश देऊन एक वर्ष झाले

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. अद्याप पालिकेने काहीच केलेले नाही. पालिका जाणीवपूर्वक कारवाई करत नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत! उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत! उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
‘सत्ताधारी एकमेकाच्या नसा आवळत आहेत. आजच बातम्या आल्यात एक कुणीतरी दिल्लीला गेलं होतं… बाबा मला मारलं सांगत’, अशा शब्दांत शिवसेना...
मोदींनी केला होता ट्रम्प यांना फोन – आमचं काम झालंय, आता युद्ध करणार नाही! अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप, भक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गोची रे गोची
मिंधे गटात खदखद आणि कमळाबाईशी गडबड-बडबड, मिंधेंची अमित शहा यांच्या भेटीनंतर नेत्यांची भाषा काहीशी बदलली
पुण्यातील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुठे समिती स्थापन केलीच नव्हती, महसूलमंत्री बावनकुळे यांचा धक्कादायक खुलासा
विधेयकावर निर्णय घ्या, परत पाठवा किंवा राष्ट्रपतींकडे पाठवा हेच राज्यपालांसमोर 3 पर्याय, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय
अमेरिकी सरकारचा 800 पानांचा धक्कादायक अहवाल, पहलगाम हल्ला बंडखोरांचा दहशतवाद्यांचा नव्हे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची सरशी…
प्रदूषणकारी बांधकामे रोखणार, हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष… प्रत्येक वॉर्डात भरारी पथक