रोज सूर्यप्रकाशात तरीही व्हिटामिन D ची कमतरता? कारण वाचून धक्का बसणार
भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे. अनेक जण सकाळच्या उन्हात फिरायला जातात. तरीही अनेकांना ड जीवनसत्वाची कमतरता भासते. या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. हाडं ठिसूळ होतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
पण सूर्यप्रकाशात रोज फिरल्याने ड जीवनसत्वाची कमतरता, उणीव भासणार नाही असे नाही. ड जीवनसत्व मिळवण्याचे ते एक माध्यम आहे. सध्या अनेकांची डी जीवनसत्व कमी झाल्याची तक्रार समोर येते. त्यामागे इतरही काही कारणं आहेत.
किती ही खा शरीराला लागत नाही असं आपण म्हणतो. तेच डी जीवनसत्त्वाबाबत आहे. अनेकदा डी जीवनसत्व शरीरात शोषलंच जात नाही. त्यामुळे उन्हात फिरल्यावरही पंचनतंत्राच्या गडबडीमुळे डी जीवनसत्व शरिरात शोषले जात नाही. म्हणजेच काय तर शरीराला लागत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो.
तर दुसरा प्रकार म्हणजे चरबी वाढल्याने सुद्धा अनेक जीवनसत्व रक्तात विरघळत नाहीत. रक्तात पोहचत नाहीत आणि ती शरिराला ताकद देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा आपल्या देशाचा नवीन शत्रू आहे. तसा तो व्हिटामिन डीचा पण शत्रू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List