तर तुमच्या कारखान्यावर असलेलं कर्ज सुद्धा आम्हीच फेडलं असतं; शेतकऱ्यांबाबत विखे पाटल्यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी सुनावलं
कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केलं होतं. यावरूनच आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विखे पाटील यांना चांगलेच सुनावलं आहे. विखे पाटील यांच्या नावालनं फेसबुकवर एक पोस्ट करत राजू शेट्टी म्हणाले आहेत की, “१९८० साली शरद जोशींनी ऊसाला प्रतिटन ३०० रूपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केलं होतं.”
राजू शेट्टी म्हणाले की, ” त्याच वडिलांचं इंजिनिअरिंग कॅालेज तुम्ही आज चालवताय. त्यामध्ये इंजिनीअंरिगच्या विद्यार्थ्याला ४.५० लाख रूपये फी घेताय व त्याच वडीलांच्या साखर कारखाना तुम्ही चालविताय. त्यामध्ये आज ऊसाला प्रतिटन ३ हजार दर देताय.”
ते म्हणाले, “इंजिनिअरिंग कॅालेजच्या फीप्रमाणे ऊस दर वाढविला असता तर आज उसाला ३० हजार रुपये दर मिळाला असता. मग आमचच कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेल कर्ज सुद्धा आम्हीच फेडल असतं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List