जमिनीवर आदळून हवेत उडाले मग समुद्रात कोसळले, रशियात हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू

जमिनीवर आदळून हवेत उडाले मग समुद्रात कोसळले, रशियात हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू

रशियातील दागेस्तान राज्यात हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्लांट (KEMZ) च्या कर्मचाऱ्यांसह प्लांटच्या उपमहासंचालकाचा समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

रशियाचे KA-226 हे हेलिकॉप्टर KEMZ कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांना घेऊन चालले होते. यादरम्यान कॅस्पियन समुद्राच्या प्रदेशात अची-सु गावाजवळील हेलिकॉप्टर अनियंत्रित झाले. यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर आदळून मग समुद्रात कोसळले. यात हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा मृत्यू झाल तर दोन जण जखमी झाले. अपघात प्रकरणी तपास सुरू आहे. KA-226 हे दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे जे सात प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे. हे सामान्यतः उंचावरील ऑपरेशन्स आणि कठीण परिस्थितीत वापरले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा… कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट...
झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? शरीरात काय होतात बदल
Chandrapur news – चंद्रपुरात बिबट्याने भररस्त्यात केली गायीची शिकार
Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने जीवन संपवले
हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश
दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळली; इंडिया गेटवर प्रदूषणाविरोधात निदर्शने, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
तर तुमच्या कारखान्यावर असलेलं कर्ज सुद्धा आम्हीच फेडलं असतं; शेतकऱ्यांबाबत विखे पाटल्यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी सुनावलं