विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा

विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते. आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, असे विखे-पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता ‘प्रहार’ संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विखे-पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

नाव राधाकृष्ण आहे, मात्र कृत्य कंसाचे करायची असतील तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्‍यांनी हाकलू लावली पाहिजे, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तर दुसरीकडे वाचाळवीर मंत्री अशी विधाने करतात. लोक मारत नाही याचे आभार माना आणि ही नायालकी थांबवा, असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्या एक लाख बक्षी देण्याची घोषणा केली. तसेच मला जर त्यांची गाडी दिसली तर मीच फोडणार, असेही ते म्हणाले.

आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचे वक्तव्य

काय म्हणाले विखे-पाटील?

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केले. पंढरपूर येथे एका सभेत भाषणादरम्यान विखे पाटील यांची जीभ घसरली. ते म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. याची चिंता नाही. महायुती सरकार 100 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा… कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट...
झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? शरीरात काय होतात बदल
Chandrapur news – चंद्रपुरात बिबट्याने भररस्त्यात केली गायीची शिकार
Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने जीवन संपवले
हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश
दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळली; इंडिया गेटवर प्रदूषणाविरोधात निदर्शने, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
तर तुमच्या कारखान्यावर असलेलं कर्ज सुद्धा आम्हीच फेडलं असतं; शेतकऱ्यांबाबत विखे पाटल्यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी सुनावलं