जास्त नोकरभरतीमुळे कर्मचारी कपात वाढली, एचआरच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

जास्त नोकरभरतीमुळे कर्मचारी कपात वाढली, एचआरच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

सध्या टेक कंपन्यासह अन्य मोठय़ा कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कंपन्या आर्टिफिशयल इंटेलिजेन्स (एआय)मुळे कर्मचारी कपात करत असल्याचा दावा अनेकांकडून केला जात असताना एका एचआरने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. या एचआरच्या म्हणण्यानुसार, कंपन्या आधीच भरमसाट नोकरभरती करतात. त्यामुळे ते कर्मचारी कपात करत आहेत, असा दावा या एचआरने सोशल मीडियावर केला आहे.

कोणतीही कंपनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय एका रात्रीत घेत नाहीत. ज्या कंपन्या नोकर कपात करत आहेत ते केवळ एआय ऑटोमेशनमुळे करत नाहीत. तर या नोकर कपातीला कर्मचारीसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. बरेच कर्मचारी प्रोसेसनुसार काम करत नाहीत. काही कर्मचारी ट्रेनिंग पूर्ण करत नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी कंपनीच्या टार्गेटवर असतात. अशा कर्मचाऱयांवर नोकरी जाण्याचा धोका जास्त असतो. तसेच काही कंपन्या ओव्हर हायरिंग म्हणजेच जास्तीची नोकर भरती करतात. कंपनीला किती लोकांची गरज आहे, हे न पाहता कर्मचारी भरती केली जाते. वेगवेगळी भूमिका पार पाडण्यासाठी नोकर भरती केली जाते. परंतु, कधी अशी वेळ येते की, कर्मचाऱयांची संख्या कमी करावी लागते. त्यावेळी कंपन्या बिनदिक्कतपणे नोकर कपात करतात, असे या एचएआरने म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱयांची नोकरी जाणार असेल त्याला आधीच इशारा दिला जातो. त्याच्यावर अचानक जास्तीच्या कामाचा लोड दिला जातो. किंवा त्याच्या कामाची जबाबदारी अन्य कोणाला दिली जाते. त्या कर्मचाऱ्याला मीटिंग्स, प्रोजेक्ट्स किंवा महत्त्वाच्या चर्चेमधून बाहेर ठेवले जाते. मॅनेजरची वागणूक अचानक बदलते. कामात चुका काढायला सुरुवात होते. प्रमोशन किंवा पगारवाढ थांबवली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल
तूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. तुपामुळे आपल्या शरीरला खुपसारे फायदे मिळतात. आहारात तुपाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. तुपाचे फक्त...
जर सतत थकवा जाणवत असेल तर, त्याची कारणे या आजारांशी संबंधित असू शकतात, अजिबात दुर्लक्ष करू नका
शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार
Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ