आता 24 तासांत ‘पीएफ’ काढता येणार, नोकरी गेल्यानंतर 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा

आता 24 तासांत ‘पीएफ’ काढता येणार, नोकरी गेल्यानंतर 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा

जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली तर त्या व्यक्तीला 24 तासात म्हणजेच दुसऱ्याच दिवशी त्याच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम काढता येईल. त्या व्यक्तीला पीएफमधील पैसे काढण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागणार नाही. जर ती व्यक्ती 12 महिने बेरोजगार राहिली तर त्या व्यक्तीला पीएफमधील संपूर्ण रक्कम काढता येईल, अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही नवीन नियम जाहीर करण्यात आले होते. नवीन नियमांनुसार नोकरी गेल्यावर पीएफ खात्यांमधून पैसे काढण्याच्या वेळेबाबत गोंधळ उडाला होता. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की आता सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतर आणि नोकरी गेल्यानंतर पीएफमधील रक्कम काढता येईल. परंतु, कामगार मंत्र्यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे. नवीन नियमांनुसार, जर एखादा ग्राहक एका दिवसासाठीही बेरोजगार असेल तर तो त्याच्या पीएफ बॅलन्सपैकी 75 टक्के रक्कम ताबडतोब काढू शकतो, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

 पीएफमधील 13 नियम रद्द

ईपीएफओने पूर्वीचे 13 कठीण नियम रद्द केले आहेत. पीएफमधील पैसे काढण्यासाठी आता केवळ तीन नियम ठेवण्यात आले आहेत. आजारपण, शिक्षण आणि लग्न या तिन्ही कारणांसाठी पीएफमधील रक्कम काढू शकतील. पूर्वी शिक्षण आणि लग्नासाठी फक्त तीन वेळा पैसे काढण्याची परवानगी होती, परंतु आता शिक्षणासाठी 10 आणि लग्नासाठी पाच वेळा पैसे काढता येतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल
तूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. तुपामुळे आपल्या शरीरला खुपसारे फायदे मिळतात. आहारात तुपाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. तुपाचे फक्त...
जर सतत थकवा जाणवत असेल तर, त्याची कारणे या आजारांशी संबंधित असू शकतात, अजिबात दुर्लक्ष करू नका
शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार
Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ