यू टर्न घेणे जीवावर बेतले, भरधाव ट्रकने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू

यू टर्न घेणे जीवावर बेतले, भरधाव ट्रकने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू

भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची धक्कादायक घटना बिर्ला गेट येथील अजमेरा बिल्डिंग परिसरात घडली. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील व भाऊ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उल्हासनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याणमध्ये राहणारे किरण चव्हाण हे पीयुष व तनिष या दोन मुलांसोबत दुचाकीने उल्हासनगरला जाण्यासाठी निघाले. शहाड ब्रीज ओलांडल्यानंतर त्यांनी बिर्ला गेटकडे जाण्यासाठी गाडी वळवली. यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तनिष ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला, तर किरण व त्यांचा दुसरा मुलगा पीयुषला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करत ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल
तूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. तुपामुळे आपल्या शरीरला खुपसारे फायदे मिळतात. आहारात तुपाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. तुपाचे फक्त...
जर सतत थकवा जाणवत असेल तर, त्याची कारणे या आजारांशी संबंधित असू शकतात, अजिबात दुर्लक्ष करू नका
शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार
Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ