Government Jobs – रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती, दहावी-आयटीआय पास तरुणांसाठी सुवर्ण संधी

Government Jobs – रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती, दहावी-आयटीआय पास तरुणांसाठी सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वेत दहावी आणि आयटीआय पास तरुणांसाठी भरती होत आहे. रेल्वे भरती कक्ष, पूर्वोत्तर रेल्वेने (आरआरसी एनईआर) गोरखपूर, इज्जतनगर, लखनौ, गोंडा आणि वाराणसी येथील वर्कशॉपमधील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. 1104 पदांसाठी अर्ज मागण्यात येत असून 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात उमेदवाराला अर्ज करता येईल.

गोरखपूर येथे मेकॅनिकल वर्कशॉपसाठी 390 जागा, सिग्नल वर्कशॉपसाठी 63 जागा, ब्रिज वर्कशॉपसाठी 35 जागा आहेत. तर इज्जतनगर येथे मेकॅनिकल वर्कशॉपसाठी 142, डिझेल शेडसाठी 60, कॅरेज आणि व्हॅगनसाठी 64 पदांसाठी भरती होत आहे. लखनौ जंक्शन येथे कॅरेज आणि व्हॅगनसाठी 149 जागा, गोंडा येथे डिझेल शेडसाठी 88 जागा आहेत. वाराणसी येथे कॅरेज आणि व्हॅगनसाठी 73, तर टीआरडीसाठी 40 जागा अशा एकूण 1104 पदांसाठी भरती होत आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, दहावीची गुणपत्रिका, आयटीआय डिप्लोमा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी, सही किंवा अंगठ्याचा ठसा. उमेदवार कमीत कमी 50 टक्क्यांसह दहावी पास असावा. तसेच त्याच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट असावे.

कुठे करता येणार अर्ज

उमेदवार ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे, तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुक्ल नाही.

वयोमर्यादा

कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 24 वर्ष. मागावर्गीय उमेदवाराशाठी जास्तीत जास्त 27 वर्ष, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 29 वर्ष वयोमर्यदा आहे. दिव्यांगांसाठी ही वयोमर्यादा 34 वर्षांपर्यंत आहे.

अर्ज करण्याची तारीख 

या सर्व पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल
तूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. तुपामुळे आपल्या शरीरला खुपसारे फायदे मिळतात. आहारात तुपाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. तुपाचे फक्त...
जर सतत थकवा जाणवत असेल तर, त्याची कारणे या आजारांशी संबंधित असू शकतात, अजिबात दुर्लक्ष करू नका
शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार
Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ