परभणी, सांगली, सातारामधील शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 136 कोटींची मदत

परभणी, सांगली, सातारामधील शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 136 कोटींची मदत

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परभणी, सांगली व सातारा जिह्यांत 1 लाख 55 हजार 318 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने आज गुरुवारी सुमारे 136 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांची मदत जाहीर केली. यामुळे किमान अडीच लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 29 जिह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग पिकांचे नुकसान झाले. तर भाजीपाला, फळे, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला. शेतीच्या नुकसानीमुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनाम्याच्या अहवालानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 73 कोटी 54 लाख 3 हजार मदत जाहीर केली होती. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी तसेच पुणे विभागातील सातारा, सांगली जिह्यांतील शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना 136 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

परभणी जिह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान 2 लाख 38 हजार 530 शेतकरी बाधित झाले असून 1 लाख 51 हजार 222 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी 128 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. सातारा जिह्यात 142 शेतकऱ्यांची 21.60 हेक्टर जमीन बाधित झाली असून त्यासाठी 3 लाख 23 हजारांची मदत देण्यात येणार आहे. तसेच सांगली जिह्यातील 13 हजार 475 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा...
केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट
आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले
पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा
तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा