तेल, वायूचे भांडार कमी होतायत, वेळीच सावध व्हा! आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने दिला हिंदुस्थानला इशारा

तेल, वायूचे भांडार कमी होतायत, वेळीच सावध व्हा! आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने दिला हिंदुस्थानला इशारा

जगभरातील तेल आणि वायूचे भांडार जलदगतीने कमी होत आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (आयईए) इशारा दिला आहे. तेल, वायूच्या आयातीवर अवलंबून असणाऱ्या हिंदुस्थानला हा मोठा धोका असेल. हिंदुस्थानने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करावी, विविध स्रोत, घरगुती व स्वच्छ ऊर्जा पर्यायांवर अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आयईएच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालासाठी आयईएने जगभरातील 15 हजार तेल आणि वायू क्षेत्रातील डेटाचे विश्लेषण केले.

हिंदुस्थान आपल्या गरजेनुसार 85 टक्के कच्चे तेल आणि 45 टक्के वायू आयात करतो. मात्र जागतिक स्तरावर तेल, वायूचा साठा कमी होत असल्याने येत्या काळात पुरवठय़ात अडथळे येऊ शकतात किंवा किमतीत वाढ होऊ शकते.

हिंदुस्थानने काय करावे?

  • आयईएच्या अहवालानुसार, तेल व वायूच्या आयातीसाठी एकाच देशावर अवलंबून राहणे कमी करावे.
  • मायदेशात तेल आणि वायूच्या शोधाला गती द्या.
  • आपत्कालीन स्थितीत तेल आणि गॅसचे भांडार वाढवा.
  • ग्रीन हायड्रोजन, बायोफ्यूल, अन्य नवीनतम ऊर्जा स्रोतावर जोर दिला पाहिजे, जेणेकरून आयातीवरचा भार कमी होईल.

नव्या प्रकल्पांसाठी 20 वर्षे

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने इशारा दिला आहे की, तेल आणि गॅस प्रकल्प विकसित करण्यासाठी साधारण 20 वर्षे लागतात. स्रोतांच्या शोधासाठी 10 वर्षे आणि त्यानंतर मूल्यांकन, मंजुरी आणि निर्मितीसाठी आणखी 10 वर्षे लागतील. यामधील गुंतवणुकीत किंवा शोध प्रक्रियेत विलंब झाला तर 2030 आणि 2040 च्या दशकात तेल, वायूचा पुरवठा कमी होऊ शकतो. परिणामी ऊर्जा, सुरक्षा, किमतीमध्ये अस्थिरता आणि उत्सर्जनावर परिणाम होईल.

का संपुष्टात येतोय साठा?

तेल आणि वायू क्षेत्रातून उत्पादन नैसर्गिकरीत्या कमी होत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे खडक आणि खोल समुद्रातील स्रोतांवर तेल व गॅस उद्योग अवलंबून आहे. हे स्रोत जमिनी स्रोतांच्या तुलनेत लवकर संपुष्टात येतात. नैसर्गिक साठे टिकवून ठेवण्यासाठी तेल आणि वायू उद्योगाला वर्षाला 90 टक्के खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नवी मागणी पूर्ण करण्यासाठी खूप कमी बजेट उरत आहेत. जर या क्षेत्रात नवी गुंतवणूक झाली नाही, तर जागतिक स्तरावर तेलाच्या उत्पादनात दरवर्षी 55 लाख बॅरल प्रतिदिन घट होईल. 2010 साली तेलाचे उत्पादन 40 लाख बॅरल प्रतिदिन पेक्षा जास्त होते. याच प्रकारे नैसर्गिक वायूचे उत्पादन दरवर्षी 270 अब्ज घनमीटर कमी होईल. जे 2010 मध्ये 180 अब्ज घनमीटर होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत...
…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क
पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा
केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध