कर्मचाऱ्यांना 20 वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छानिवृत्ती

कर्मचाऱ्यांना 20 वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छानिवृत्ती

केंद्रीय निवृत्तीवेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी) नियम, 2025 अधिसूचित केले. या नियमांनुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (एनपीएस) एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच व्हीआरएस घेण्याची मुभा मिळेल. मात्र 25 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच संपूर्ण पेन्शन मिळणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार, संपूर्ण पेन्शन (अश्युअर्ड पेआऊट) मात्र 25 वर्षांची पात्र सेवा पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे. संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या 50 टक्के एवढी पेन्शन होय. 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार (प्रो-राटा) दिला जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा...
केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट
आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले
पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा
तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा