मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग

मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग

<<< संध्या शहापुरे >>>

आज सकाळी आपल्याच मनाचा शोध घ्यावा वाटला. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.’ मन प्रसन्न करण्याचे अनेक बाह्य मार्ग आपण शोधत असतो. अगदी सुगंधी फुलांचा सभोवताली सडा असावा, अत्तराचे दिवे उजळावेत, सुंदर रेशमी वस्त्र परिधान करावीत असं रम्य वातावरण निर्माण करूनही कधी-कधी मन प्रसन्न होत नाही. म्हणजे सभोवतालचे वातावरण प्रसन्न आहे म्हणून नाही मन प्रसन्न होत. मग मन कसं करायचं प्रसन्न? …तर अंतरिक भाव जेव्हा प्रसन्न असतील तेव्हाच आपण म्हणू की, आपलं मन प्रसन्न आहे किंवा आपण आनंदी आहोत. पण हे मन प्रसन्न करण्याचा मार्ग आहे का? असा विचार करताना एकदम मनात आले ते लहानपणी घोकून पाठांतर केलेले रामदासांचे मनाचे श्लोक. या 205 श्लोकांत रामदासांनी मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग सांगितलाय असं मला वाटतं. मनातले विचार शुद्ध झाले, मनातील किल्मिषे दूर झाली तर उदास करणारे, नैराश्य आणणारे विचार येणं बंद होतील. मन आनंदी, प्रसन्न राहील. मनाच्या श्लोकातील एक एक श्लोक समोर ठेवू या आणि तो मार्ग कसा आचरणात आणायचा ते पाहू या. भेटू या पुढल्या भागात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका