यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, जयंत पाटील यांची भाजपवर टीका

यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, जयंत पाटील यांची भाजपवर टीका

 

केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण दर महिन्याला बदलत असतं असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी भाजपचे नेते म्हणत होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, आणि आज तेच म्हणत आहेत की आपण पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू. त्यांचे धोरण दर महिन्याला बदलतं आणि यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, हे जगाने अनुभवले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना मदत केली आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. तसेच हिंदू, मुस्लीम आणि भारतातील प्रत्येक नागरिक जाणतो की पाकिस्तान आपला शत्रू आहे असेही आव्हाड म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका