यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, जयंत पाटील यांची भाजपवर टीका

यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, जयंत पाटील यांची भाजपवर टीका

 

केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण दर महिन्याला बदलत असतं असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी भाजपचे नेते म्हणत होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, आणि आज तेच म्हणत आहेत की आपण पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू. त्यांचे धोरण दर महिन्याला बदलतं आणि यामुळेच आपली परराष्ट्रनीती सतत अपयशी ठरत आहे, हे जगाने अनुभवले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना मदत केली आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. तसेच हिंदू, मुस्लीम आणि भारतातील प्रत्येक नागरिक जाणतो की पाकिस्तान आपला शत्रू आहे असेही आव्हाड म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;