गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधनांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल

गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधनांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल

एखाद्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी तुरुंगातून सरकार चालवणे कितपत योग्य आहे असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. त्यावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधनांनीही आपले पद सोडावे का? असा प्रतिसवाल केला आहे.

अमित शहा यांनी एका मुलाखातीत म्हटले होते की, जर कुणी नेता पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या खटल्यात तुरुंगामध्ये गेला आणि त्याला 30 दिवसांत जामीन मिळाला नाही, तर त्याने पद सोडले पाहिजे. किरकोळ आरोपांसाठी मात्र पद सोडण्याची गरज नाही. पण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचे आरोप आहेत, असे मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी तुरुंगात बसून सरकार चालवणं कितपत योग्य आहे? असा सवाल अमित शहा यांनी विचारला.

त्यावर उत्तर देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्या व्यक्तीने गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगाराला आपल्या पक्षात सामील करून घेतले, त्यांच्या सर्व खटले निकाली काढून त्यांना मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनवले, अशा मंत्र्याने किंवा पंतप्रधानानेही आपले पद सोडले पाहिजे का? अशा व्यक्तीला किती वर्षांची शिक्षा व्हावी? तसेच जर एखाद्या नेत्यावर खोटा खटला लावून त्याला तुरुंगात टाकले आणि नंतर तो निर्दोष सुटला, तर असा खोटा खटला लावणाऱ्या मंत्र्याला किती वर्षांची शिक्षा व्हावी? असा प्रतिसवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व 125 वर्षाची निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध अशा टेंबे गणपतीचे सोमवारी प्रतिपदे दिवशी हजारो भाविकांच्या...
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा
Mumbai News – बहिणीच्या प्रियकराची हत्या केली, मग पोलिसांसमोर कबुली, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी