निर्माल्यापासून खतनिर्मिती, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट हा नियमित भेडसावणारा प्रश्न आहे. याचा परिणाम जलचरांवर आणि सागरी संपत्तीवर होतो. याविषयी जनजागृतीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
राज्यपालांचे स्वच्छता दूत आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मुंबईत गिरगांव चौपाटी आणि जुहू चौपाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गिरगांव व जुहू येथे सुमारे 6500 किलो निर्माल्य संकलित करुन त्यापासून गांडूळ खत बनविण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List