निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश

निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचाही समावेश आहे. याशिवाय, ३५९ इतर पक्षांविरुद्धही डीलिस्टिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कारवाई प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत घेतली गेली असून, सक्रिय नसलेल्या किंवा एकही निवडणूक लढवले हे पक्ष आहेत. तसेच या पक्षांचे कार्यालयेही सापडत नाहीत. त्यामुळे ही कारवाई केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

या कारवाईबद्दल माहिती देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, ज्या पक्षांनी सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नाही, त्यांना डीलिस्ट केले आहे. हा निर्णय १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आला. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट २०२५ रोजी ३३४ पक्षांना डीलिस्ट करण्यात आले होते. अशा प्रकारे, गेल्या दोन महिन्यांत एकूण ८०८ पक्षांची नोंद रद्द करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;