महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ‘तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड आहे’, असे वादग्रस्त विधान केले. यामुळे पडळकर यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ? असा परखड सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

अमोल कोल्हे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis, विचार करा… आपण केवळ एका पक्षाचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय ! यापोस्टसोबत त्यांनी एक पत्रकही शेअर केले आहे.

या पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, जय शिवराय। माकडाच्या हाती कोलीत दिले आणि ते बोंबलत आग लावत सुटले तर दोष माकडापेक्षा कोलीत देणाऱ्याचा जास्त असतो, असे म्हणतात.. सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात दिवसागणिक आपल्या वक्तव्यांनी नीचतम पातळी गाठण्याची अहमहिका काही वाचाळवीरांमध्ये लागलेली दिसून येते.. दुर्दैवाने सत्तेच्या वळचणीला असू तर काहीही खपू शकते हा समज दृढ झाला तर येणारा भविष्यकाळ कधीही माफ करणार नाही..राज्याचे प्रमुख या नात्याने आणि एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत… त्या धुळीस मिळू नयेत ही देखील अपेक्षा… या वाचाळवीरांच्या बेताल बडबडी ऐकून एका प्रसिध्द नाटकातील संवाद आठवतो – “तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती?” या धर्तीवर या वाचाळवीरांना सांगावेसे वाटते – “आपली पात्रता काय.. आपण बोलतोय काय?” असे या पत्रकात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय? Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती...
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा
जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला
भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल