भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप

भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप

मुंबई ते नवी मुंबईदरम्यान सुलभ प्रवास करण्यासाठी अटल सेतू हा सागरी सेतू बांधण्याच आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर वर्षभरातच याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या सेतूनवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याने जाताना वाहनचालकांना तारवेरची कसरत करावी लागत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत त्यांनी एक्सवर पोसेट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमचे सरकार पाडण्यात आले तेव्हा अटल सेतूचे 82% पूर्ण झाले होते. त्यानंतर फेकनाथ मिंधे आणि भाजप सरकार राज्यात बसवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात शिल्लक राहिलेल्या 18 टक्के कामाला तब्बल 2 वर्षे लागली. या विलंबानंतर अखेर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात आले. या अटल सेतूच्या उद्घाटनानंतर एका वर्षातच रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचावकांना ररस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय? Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती...
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा
जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला
भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल