भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान सुलभ प्रवास करण्यासाठी अटल सेतू हा सागरी सेतू बांधण्याच आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर वर्षभरातच याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या सेतूनवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याने जाताना वाहनचालकांना तारवेरची कसरत करावी लागत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
The MTHL, named Atal Setu, was 82% complete when our government was toppled.
Then Fakenath Mindhe and BJP government was forced on to our state.
Road surfacing began. The rest of the work took 2 years.
Inaugurated in 2024, after a delay of 6 months.
Now damaged within a… pic.twitter.com/iHAtKQxtEP
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 19, 2025
याबाबत त्यांनी एक्सवर पोसेट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमचे सरकार पाडण्यात आले तेव्हा अटल सेतूचे 82% पूर्ण झाले होते. त्यानंतर फेकनाथ मिंधे आणि भाजप सरकार राज्यात बसवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात शिल्लक राहिलेल्या 18 टक्के कामाला तब्बल 2 वर्षे लागली. या विलंबानंतर अखेर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात आले. या अटल सेतूच्या उद्घाटनानंतर एका वर्षातच रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचावकांना ररस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List