नियोजनाअभावीच उत्तरेत नैसर्गिक आपत्तींचा फटका; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांची केंद्रावर टीका

नियोजनाअभावीच उत्तरेत नैसर्गिक आपत्तींचा फटका; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांची केंद्रावर टीका

उत्तर हिंदुस्थानातील दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. उत्तरेतील पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर प्रशासकीय नियोजनातील गंभीर त्रुटींचा परिणाम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्ये सध्या निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. या संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांप्रती माझी सहानुभूती आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळेच नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकारांना आणि या भागातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत देईल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ‘ही आपत्ती आता दशकातून एकदा घडणारी घटना राहिलेली नाही. प्रत्येक राज्याला या हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. डोंगरफोड, झाडांची कत्तल, नद्यांचे मार्ग बदलणे आणि इतर अनेक कृतींचा हा थेट परिणाम आहे’ अशा शब्दांत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

हवामान बदलाविरोधात ठोस पावले उचला

आता केवळ तत्काळ बचाव, मदत आणि नुकसानभरपाई पुरेशी नाही. हिंदुस्थान आणि हिंदुस्थानींच्या भविष्यासाठी हवामान बदलाविरोधात ठोस पावले उचलायला हवीत, अशी गरज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय? Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती...
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा
जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला
भाजप-मिंधे राजवटीच्या लूटमारीला अंत नाही! अटल सेतूच्या दूरवस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा संताप
Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल