रेल्वे पोलीस अंमलदारांचे दृष्कृत्य, प्रवाशाला धमकावत मारहाण करून लुटले

रेल्वे पोलीस अंमलदारांचे दृष्कृत्य, प्रवाशाला धमकावत मारहाण करून लुटले

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात राजस्थानच्या एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या तिघा कर्मचाऱयांनी लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेची धमकी देत मारहाण करून प्रवाशाचे 30 हजार जबरीने घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

कमल सोनी (37) हा प्रवासी राजस्थानला जाण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आला. त्यावेळी एका खाकी गणवेशधारी पोलिसाने थांबवले व बॅग तपासली. बॅगेत 14 ग्रॅम सोन्याचा तुकडा आणि 31 हजार 900 रुपये आढळून आले. त्यामुळे त्या पोलिसाने त्यांच्या साथीदार अंमलदारासह त्याला एका बंद खोलीत नेऊन त्याला शिवीगाळ करत धमकावले आणि मारहाण करून त्याच्याकडील 30 हजार काढून घेतले आणि त्याला सोडून दिले. त्यानंतर कमल दुरांतो एक्स्प्रेसने राजस्थानला गेला. तिथे गेल्यावर त्याने रतनगड पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन तो मुंबई सेंट्रल पोलिसांकडे पाठविण्यात आला असून आता या प्रकरणाचा तपास रेल्वे गुन्हे पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला
धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले