वर्मा तुमचे मित्र आहेत का? मर्यादा पाळा! आडनावाने बोलावले; सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले

वर्मा तुमचे मित्र आहेत का? मर्यादा पाळा! आडनावाने बोलावले; सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या आडनावाने बोलावणाया वकिलाला फटकारले. ते तुमचे मित्र आहेत का, मर्यादा पाळा, अशा शब्दांत सुनावले. वकील मॅथ्युज नेदुम्परा यांनी न्यायमूर्ती वर्मा यांना केवळ वर्मा असो संबोधले होते, यावरून सरन्यायाधीश बी आर गवई संतापले.

न्यायमूर्ती तुमचे मित्र नाहीत, ते अजूनही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. तुम्ही त्यांना कसे बोलावत आहात, थोडी तरी मर्यादा पाळा, तुन्ही एका विद्वान न्यायमूर्तीशी बोलत आहात, असे सरन्यायाधीश म्हणाले. यावर मला वाटत नाही की त्यांना इतका सन्मान द्यायला हवा, असे वकील म्हणाले. त्यानंतर सरन्यायाधीशांचा पारा आणखी चढला. कृपया कोर्टाला ऑर्डर देऊ नका, असे सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज यांना दरडावले. तसेच मॅथ्यूज यांनी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली. मॅथ्यूज यांनी वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Skin Care – तुमच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य दडलंय या फुलामध्ये, वाचा Skin Care – तुमच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य दडलंय या फुलामध्ये, वाचा
झेंडू हे एक असे फूल आहे जे प्रत्येक शुभ कार्यासाठी वापरले जाते. मुख्य म्हणजे झेंडूचे फूल हे बारमाही उपलब्ध असते....
मी नैराश्यग्रस्त असताना हिंदुस्थानात परतले, माझे डोके भिंतीवर आपटावे असे सतत वाटायचे! शिल्पा शिरोडकर
हिंदुस्थानी जोडप्याचा अमेरिकेत कोट्यवधींचा घोटाळा, 100हून अधिक लोकांना लावला चुना
शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावला, एकतर्फी प्रेमातून माथेफिरू कृत्य
ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे प्रमोशन; प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती यांच्यासह चौघांना ईडीचे समन्स
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सप्टेंबर महिन्यात पर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत? माणिकराव कोकाटे प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल