100 आलिशान गाड्या चोरल्या, एमबीए चोराचा ‘कार’नामा उघड

100 आलिशान गाड्या चोरल्या, एमबीए चोराचा ‘कार’नामा उघड

तामिळनाडू पोलिसांनी आलिशान कार चोरणाऱ्या चोराला अटक केली आहे. तो एमबीए पदवीधर असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो कार चोरी करून आलिशान जीवन जगत होता.

गेल्या महिन्यात चेन्नईतील अण्णा नगर येथे कार चोरीला गेली होती. अण्णा नगरमधील कथिरावन कॉलनीतील रहिवाशी एथिराज रथिनम यांनी घराच्या बाहेर त्यांची महागडी आलिशान कार पार्क केली होती. मात्र पहाटे त्यांची कार चोरीला गेली. पहाटे आलेल्या त्या चोराने अत्याधुनिक साधनांचा वापर करून कार पळवली होती. इतकी महागडी कार चोरीला गेल्याने एथिराज यांना धक्का बसला. त्यांनी तिरुमंगलम पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तपासात संशयित पुद्दुचेरीमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून राजस्थानच्या सतेंद्र सिंह शेखावतला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आणि पोलिसांना धक्काच बसला. सतेंद्र एमबीए पदवीधर आहे आणि त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. सतेंद्रला अटक झाल्यानंतर 10पेक्षा अधिक कार मालकांनी तिरुमंगलम पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्यात गदारोळ झाला.

गेल्या 20 वर्षांपासून सतेंद्र सिंह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांमधून आधुनिक उपकरणांचा वापर करून आलिशान गाड्या चोरत होता. चोरी केलेल्या या महागड्या कारची तो राजस्थान आणि नेपाळमध्ये विक्री करून पैसे कमवत होता. सतेंद्रने आतापर्यंत 100हून अधिक आलिशान गाड्या चोरल्या आहेत आणि त्या विकून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांमधून तो आलिशान जीवन जगत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या 5 लोकांसाठी नारळपाणी विषापेक्षा कमी नाही, तुम्हीही तिच चूक करत असाल तर आजच बंद करा या 5 लोकांसाठी नारळपाणी विषापेक्षा कमी नाही, तुम्हीही तिच चूक करत असाल तर आजच बंद करा
नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी किती चांगले असते हे सर्वांनाच माहित आहे. त्याच अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी अमृतासमान...
Kalyan News – कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी! मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण
Apache Helicopters – आता शत्रूंची खैर नाही! हिंदुस्थानी सैन्याला मिळाले अपाचे हेलिकॉप्टर
हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा; एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजनांना आव्हान
आई आणि बायकोच्या नावाने डान्सबार काढून मुली नाचवता, लाज नाही वाटत? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अनिल परब यांची मागणी
62 वर्षांच्या शौर्याला सलाम! हवाई दल MIG-21 ला सन्मानाने देणार निरोप
लोकल ट्रेन बॉम्बस्फोटप्रकरणी महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; मुंबई हायकोर्टाच्या निकालाला आव्हान