मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा

मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा

29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षण मोर्चा काढणार असून, आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार आहोत. आम्ही 2 वर्षे सरकारला वेळ दिला. अजून किती वेळ द्यायचा, असा सवाल उपस्थित करून मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी आरक्षण आंदोलनावर चर्चा करण्यासाठी उद्या आंतरवालीत शेवटची बैठक होत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आतापर्यंत काय मिळालं? काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आपली कामे सोडून बैठकीला या, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणे हा बैठकीचा अजेंडा असून, आता विजय मिळवायचाच असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?