प्रसूती रजा हा संविधानाने महिलांना दिलेला हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

प्रसूती रजा हा संविधानाने महिलांना दिलेला हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

महिला कर्मचाऱयांना नोकरी करत असताना मिळणारी प्रसूतीची रजा हा केवळ सामाजिक न्यायाचा विषय राहिला नसून तो कर्मचाऱयांना संविधानाने दिलेली हमी आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्वाळा दिला. मद्रास उच्च न्यायालयाने एका सरकारी शिक्षिकेला तिच्या तिसऱया अपत्याच्या जन्मासाठी प्रसूती रजा नाकारण्याचा आदेशसुद्धा क़ोर्टाने धुडकावला. न्यायाधीश अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. महिला कर्मचाऱयांप्रती सामाजिक न्यायाची भूमिका ठेवणे, त्यांची ऊर्जेची भरपाई करणे, बाळाचे पालनपोषण करणे आणि त्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर पुन्हा आधीसारखी कार्यक्षमतेची पातळी राखणे हा प्रसूती रजेमागील उद्देश आहे. हा केवळ मातृत्वाचा विषय नसून नवजात बाळाकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

काय म्हटले होते मद्रास उच्च न्यायालयाने

सरकारी धोरणानुसार, दोन अपत्यानंतर प्रसूतीसाठी रजा मंजूर करता येत नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने या शिक्षिका महिलेची प्रसूती रजा नाकारली होती. परंतु महिलेचे तिसरे अपत्य हे दुसऱया लग्नातून झालेले आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला. मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क आहे. यामध्ये महिलांना जगण्याचा अधिकार, आरोग्य, प्रतिष्ठा मिळते, असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट-अनुष्का अध्यात्मात दंग, अजून एका ‘तीर्थक्षेत्राला’ भेट; अयोध्येत या मंदिरात केली खास पूजा कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट-अनुष्का अध्यात्मात दंग, अजून एका ‘तीर्थक्षेत्राला’ भेट; अयोध्येत या मंदिरात केली खास पूजा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आजकाल अध्यात्माच्या मार्गावर चालताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट...
शोक व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? अंत्यविधीदरम्यान अभिनेत्याने केलं असं वक्तव्य, भडकले नेटकरी
मिंध्यांनी मुंबई महापालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावी लागेल; आदित्य ठाकरे कडाडले
थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांची टरकली; हिंदुस्थानच्या धास्तीने संरक्षण बजेटमध्ये वाढ
ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…
Bullet Train : एकदम सुपरफास्ट….या दिवशी बुलेट ट्रेन धावणार, तारीख जाहीर, मुंबईपर्यंत केव्हा पूर्ण होणार काम