प्रशासकीय मनमानीला चाप, निवृत्तीनंतर शिस्तभंगाची शिक्षा देता येणार नाही

पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱयाला निवृत्तीनंतर शिस्तभंगाची शिक्षा देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र होमिओपॅथी काwन्सिलमधील दोन महिला कर्मचाऱयांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना कामावरून काढून टाकण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्यांची ग्रॅच्युईटी व पीएफ रोखण्यात आला होता. या शिक्षेला त्यांनी अॅड. सागर अशोक माने यांच्यामार्फत याचिका दाखल करून आव्हान दिले होते.

न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱयाला निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई करत शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात नाही. शिक्षेसाठी ग्रॅच्युईटी व पीएफदेखील रोखता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आस्थापनेच्या स्वतंत्र अधिनियमात कारवाईसाठी खास नियम असेल तरच कर्मचाऱयाला निवृत्तीनंतर शिस्तभंगासाठी शिक्षा देता येते, असेही नमूद करत या दोन्ही कर्मचाऱयांची शिक्षा रद्द करत त्यांना निवृत्ती लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने काwन्सिलला दिले आहेत.

काय आहे प्रकरण…
शामला हर्डीकर व माधवी शिंदे अशी या महिला कर्मचाऱयांची नावे आहेत. शामला 31 मार्च 2011 रोजी निवृत्त झाल्या तर माधवी 31 मे 2010 रोजी निवृत्त झाल्या. शिस्तभंगाची कारवाई म्हणून या दोन्ही महिला कर्मचाऱयांना 5 फेब्रुवारी 2013 रोजी कामावरून काढून टाकण्याची शिक्षा देण्यात आली. या दोघींना पेन्शन लागू नव्हती. परिणामी या दोघी सेवेत असताना शिस्तभंगाची सुरू झालेली कारवाई निवृत्तीनंतरही सुरू ठेवून शिक्षा देता येते का, या मुद्दय़ावर प्रामुख्याने न्यायालयाने सुनावणी घेतली.

वारसांना लाभ

ही याचिका प्रलंबित असताना माधवी यांचे निधन झाले. त्यामुळे निवृत्तीचा लाभ त्यांच्या वारसांना द्यावा, असे आदेश न्यायालयाने कौन्सिलला दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट
राज्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यंदा मे महिन्यावर पावसाने अधिक्रमण केले. अवकाळी पावसाने सूर्यदेवाला झाकळून टाकले. तर यंदा मान्सून...
बहाण्याने बोलावलं आणि गुंगीचं औषध देऊन…, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलेली धक्कादायक घटना
पहिल्यांदाच होणार स्वामींची भस्मारती; निस्सीम भक्तीचं नवं गूढ उलगडणार
‘बाऊन्सर’ शब्दावरून हायकोर्टाने फटकारले, यामागे लोकांच्या मनात भीती, दहशत निर्माण करण्याचा हेतू
कतार अमेरिकेवर मेहेरबान! डोनाल्ड ट्रम्प यांना 3400 कोटींचे विमान भेट
टेस्लाच्या सीएफओला 11,95,20,06,911 रुपये पगार, वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना टाकले मागे
यूट्यूबर महिन्याला कमावतो 427 कोटी