ईशान्येकडील मिझोरम राज्याने हिंदुस्थानातील पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला

ईशान्येकडील मिझोरम राज्याने हिंदुस्थानातील पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला

मिझोरम या राज्याने सध्याच्या घडीला एक मोठी कामगिरी केली आहे. मिझोरम हे हिंदुस्थानातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी (20 मे) ला घोषणा केली आहे. केरळसह सर्व राज्यांना मागे टाकत, ईशान्येकडील या राज्याने देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकवला आहे. यापूर्वी, लडाख या केंद्रशासित प्रदेशानेही 2024 मध्ये पूर्ण साक्षरतेचे लक्ष्य गाठले आहे.

ULAS- नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मिझोरामला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आले. हे उल्लेखनीय यश मिळवणारे हे हिंदुस्थानातील पहिले राज्य आहे. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रात शिक्षण राज्यमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), जयंत चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी ऐझॉल येथे राज्याचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांच्या उपस्थितीत याची घोषणा केली आणि त्यांना या कामगिरीबद्दल प्रमाणपत्रही दिले.

मिझोरमने शिक्षण क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आता राज्यात एकही अशिक्षित व्यक्ती नाही. राज्यातील प्रत्येक व्यक्ती (15 वर्षांवरील) आता वाचू आणि लिहू शकते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मते, मिझोरमने ULLAS म्हणजेच नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत हे यश मिळवले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेने लाखो लोकांना साक्षर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन साक्षरता अभियानांतर्गत, 97 टक्के साक्षरता गाठल्यानंतर कोणतेही राज्य पूर्णपणे साक्षर घोषित केले जाते.

शिक्षण मंत्रालयाच्या मते, 2011 च्या जनगणनेत देशाचा साक्षरता दर 79.04 टक्के होता. 2011 च्या जनगणनेत, मिझोरमचा साक्षरता दर 91.33% होता, जो देशात तिसऱ्या क्रमांकावर होता. ULLAS योजनेअंतर्गत, 2023 मध्ये राज्यभरात एक सर्वेक्षण करण्यात आले. 3,026 निरक्षर लोकांची ओळख पटवण्यात आली. त्यापैकी 1,692 जणांनी दररोज अभ्यास सुरू केला. यानंतर साक्षरता दर 98.20% पर्यंत पोहोचला. सरकारने 292 स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, तज्ञ आणि क्लस्टर रिसोर्स कोऑर्डिनेटर यांचा समावेश होता. या लोकांनी मिळून सर्वांना शिकवण्यात मदत केली. शिक्षण मंत्रालयाने जुलै 2023 मध्ये ULLAAS नावाचा एक नवीन साक्षरता अभियान कार्यक्रम जाहीर केला होता. ज्यामध्ये साक्षरतेचे नवीन मानके निश्चित करण्यात आली होती, तर राज्यांना या मोहिमेत वेगाने पुढे जाण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ब्रेक, पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी – पालकांना मन:स्ताप
ईद नाही तर, या दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट
महिलांविरुद्ध अशी भाषा? अभिजित अय्यर-मित्र यांना कोर्टाचा खरमरीत सवाल, Newslaundry च्या विरोधातील पोस्ट हटविणार
फडणवीसांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू – हर्षवर्धन सपकाळ
अणुशास्त्रज्ञ डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास