पवई तलाव होणार स्वच्छ, सुंदर, सांडपाणी इतरत्र वळवणार; पर्यावरण, जैव विविधता संवर्धनासाठी निर्णय

पवई तलाव होणार स्वच्छ, सुंदर, सांडपाणी इतरत्र वळवणार; पर्यावरण,  जैव विविधता संवर्धनासाठी निर्णय

पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैव विविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी इतरत्र वळवणे आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वतंत्रपणे दोन निविदा काढण्यात आल्या असून याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर पाण्यातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचा वेगही वाढवण्यात येणार आहे.

मुंबई विकसित होत असताना पवई जलाशयातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र त्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची संख्या वाढल्यानंतर तसेच पवई तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे या तलावातून केला जाणार पाणीपुरवठा गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. पवई तलावात गेल्या काही दिवसांत जलपर्णी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) खात्यामार्फत दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सारण वाहिनी अंथरणे आणि 8 दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे.  या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिका मुख्यालयात बैठक झाली. या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश पुढील आठवडय़ात द्यावा, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. बैठकीला उपायुक्त शशांक भोरे, उपायुक्त यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, मुख्य अभियंता विनोद केकाण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

25 हजार मेट्रिक टन जलपर्णी हटवली 

पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे 25 हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. मात्र जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलावात मोठय़ा प्रमाणात पह्फावली आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती वाढवणे आवश्यक असल्याचे बांगर यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय ओला-उबर कॅब रद्द केली तर प्रवाशासह चालकालाही दंड; राज्य सरकारचा नवा निर्णय
मुंबईत ओला-उबरसारख्या अ‍ॅग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश (GR) जाहीर केला. या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही...
पर्सनल कामं उरकून घ्या, आठ दिवस पावसाचं धुमशान, हवामान खात्याचा मुंबईसाठी इशारा काय?
महिला – पुरुषांमधील संबंध म्हणजे जगाचा नियम आणि…, अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
लष्करचा सह-संस्थापक अमीर हमजा अपघातात गंभीर जखमी, लाहोरच्या रुग्णालयात मोजतोय अखेरच्या घटका
स्पेनमध्ये इंटरनेट ठप्प, कॉलही जात नाही
दिलासा! सोने आणि चांदीच्या दरात घसरण
ईशान्येकडील मिझोरम राज्याने हिंदुस्थानातील पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला