कोरोनाचे भूत मानगुटीवरून उतरेना, मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचे भूत मानगुटीवरून उतरेना, मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ

एकीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे प्रशासनाने म्हटले आहे. 2020 आणि 2021 साली कोरोनाची लाट आली होती आणि त्यात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता ही लाट नसून फक्त काही रुग्णांची संख्या वाढली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकाच्या वेबसाईटनुसार सध्या देशात कोरोनाचे 93 सक्रिय रुग्ण आहेत. महिन्याकाठी मुंबईत 8 ते 9 रुग्ण आढळतात अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कोरोना हा आपल्यात राहणारच आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे असले तरी शहरातल्या तापाच्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शनिवारीही ब्रीच कँडी रुग्णालयातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 200 इतकी झाली आहे. तसेच रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही…
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार...
70 वर्षांच्या अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; झाला ट्रोल
आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर
लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी
गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा
‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी
असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर