नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? वाघांच्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक

नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? वाघांच्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक

जर पुन्हा वाघाच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांचे प्रेत वनविभागाच्या कार्यालयाबाहेर ठेवून असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. तसेच नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला.

चंद्रपुरात आठ दिवसांत वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, पालकमंत्र्यांनी, वनमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे. आठ दिवसांत आठ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले हे वाघ शाप आहे की वरदान? शेतकरी आणि शेतमजूरांचे जगणे कठीण झाले आहे. जंगलाच्या बाजूला असलेल्या शेतीला कुंपण घालावे, ही आमची मागणी आहे. नुकसानभरपाई देऊन तुम्ही लोकांचे जीव परत आणू शकत नाही. वनविभागाच्या लोकांचा बळी द्या आणि त्यांना पैसे द्या असे वडेट्टीवार म्हणाले.

तसेच वाघांच्या हल्ल्याबात पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी, ज्यांना अधिवास कमी पडत आहे अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी. यापुढे वाघांचा बंदोबस्त झाला नाही आणि वाघाच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर ते प्रेत आम्ही वनविभागाच्या कार्यालयासमोर ठेवू. जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही…
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार...
70 वर्षांच्या अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; झाला ट्रोल
आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर
लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी
गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा
‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी
असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर