Latur News- अवकाळीच्या पहिल्याच पावसात नालेसफाई च्या कामावर प्रश्नचिन्ह

Latur News- अवकाळीच्या पहिल्याच पावसात नालेसफाई च्या कामावर प्रश्नचिन्ह

अवकाळी शनिवारी सायंकाळी पावसाने चाकूर शहराला चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसामुळे नगरपंचायत च्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. एका अवकाळी पावसाने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

अवकाळी पावसामुळे नाले सफाई चे काम न झाल्यानेच नाल्यातील घाण रस्त्यावर आली. त्या घाणीमुळे शहरात दुर्गंधी पसरली असून चाकूर येथील नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई चे काम पूर्ण न झाल्याने या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार हा वेगाने होतो. अगोदरच डासांचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यातच ही घाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाली पेक्षा रस्त्यावरूनच पाणी वाहण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे काही काळ नाली की रस्ता अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे नाले सफाई चे काम वेळेवर होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. याचा त्रास मात्र स्थानिक नागरिकांना होत आहे. वाहनधारकांना देखील वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. वृद्ध तसेच नागरिक या पाण्यातून वाट शोधत जात होते. या पाण्यामुळे उजळंब रोडवरील घरांमध्ये नालीचे पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांचे नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही…
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार...
70 वर्षांच्या अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; झाला ट्रोल
आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर
लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी
गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा
‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी
असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर