‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले

‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा, असा संदेश बावनकुळे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतला. चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना थोडी लाज वाटली असती तर असे विधान केले नसते, असे राऊत यांनी म्हटले.

भाजपवर संजय राऊत यांनी कठोर टीका केली. ते म्हणाले, आजचा महाराष्ट्रातील भाजप हा खरा भाजप नाही. त्यांना सत्तेचा माज आली आहे. आजचा भाजप ७० टक्के इतरांचा पक्ष आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील लोक पाहा किंवा विधान परिषदेतून निवडून आलेली आमदार पाहा, हे उपरे आहेत. पक्षातील लोकांना स्थान देण्याऐवजी त्यांना संधी दिली आहे. ज्या लोकांनी संघावर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. त्या लोकांना सोबत घेऊन भाजप पक्ष वाढवत आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सांगितले की, भाजपकडे आज सत्ता आहे. पण तेव्हा त्यांची सत्तेची सूज उतरेल तेव्हा त्यांना याबाबत कळेल. चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना थोडी जरी लाज वाटली असती तर असे वक्तव्य केले नसते. तुमचा पक्ष तुमच्या विचारधारेवर वाढवा. तुमची विचारधारा काय आहे. ते पाहा. परंतु भाजपची नाही तर अमित शाह यांची विचारधारा ते आज राबवत आहे. त्यामुळेच इतर पक्ष फोडण्याचा विचार ते करतात. आता ते शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.

शीख दंगलीबाबत राहुल माफी मागितली. त्यापासून नरेंद्र मोदी यांनी शिकायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले. कुटुंबाची नाती वेगळी असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात, असे राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला एकनाथ शिंदे गेले नाहीत. त्यांच्याच सरकारच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत. त्याचा अर्थ त्यांनी स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही. ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही. जे भावी मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यापासून आता सावध राहायला पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल अभिनेत्रीने तिच्या 16 वर्षांच्या लेकीला दिला ‘ते’ टॉय वापरण्याचा सल्ला; कारण जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. आता अशीच एक अभिनेत्री आहे जी अशाच एका विधानामुळे चर्चेत...
‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
तुम्ही सुद्धा ‘Sugarfree Diet’ करताय? आरोग्यावर ‘हे’ गंभीर परिणाम दिसून येतील….
हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे का? हसन मुश्रीफ संजय शिरसाटांवर भडकले
Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट