पुण्यात बनावट नोटांचा छापखाना

पुण्यात बनावट नोटांचा छापखाना

बनावट नोटांचा छापखानाच पुण्यात उघडकीस आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करीत 28 लाख 66 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी उपस्थित होते. याप्रकरणी मनीषा स्वप्नील ठाणेकर (33), भारती तानाजी गवंड (34), सचिन रामचंद्र यमगर (35), नरेश भिमप्पा शेट्टी, प्रभु गुगलजेड्डी (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या पॅश डिपॉझिट मशिनमध्ये 200 रुपयांच्या 55 बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार 17 एप्रिलला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने  गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी मनीषा, भारती, सचिन यांना 18 एप्रिलला अटक केली. त्यांच्या चौकशीनुसार नरेशला ताब्यात घेत अटक केली.  गुगलजेड्डी याचाही गुह्यात सहभाग असल्याने त्यालाही अटक केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच...
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू