मंत्र्यांवर कारवाई कधी? जैन मंदिर पाडल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

मंत्र्यांवर कारवाई कधी? जैन मंदिर पाडल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत पालिकेने एक जैन मंदिर पाडले आहे. यावरून अधिकाऱ्याची बदली झाली, पण मंत्र्यावर कारवाई कधी होणार असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरेयांनी विचारला आहे. तसेच मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे सहपालकमंत्री आहेत ते नेमक्या कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, सह-पालकमंत्री निव्वळ नाटक करत आहेत! मुख्यमंत्री – त्यांच्याच पक्षाचे. मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते. ते स्वतः – त्या जिल्ह्याचे सह-पालकमंत्री. कारवाई कोणी केली? मुंबई महानगरपालिकेने, जी मुख्यमंत्री कार्यालयातून चालते. कुठे? ज्या जिल्ह्याचे ते सह-पालकमंत्री आहेत तिथल्या परिसरात. मग ते नेमका कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत? त्यांना पूर्ण हक्क होता. मुंबई महानगरपालिकेला सांगायचा की केस ऐकली जाईपर्यंत कारवाई करू नये. तसं त्यांनी का केलं नाही? ते जैन समाजाला आणि नागरिकांना खोटं सांगत आहेत! प्रश्न आहे — नेहमीप्रमाणे अधिकारी बदलला गेला, पण मत्र्यांवर कारवाई कधी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात