भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी
On
गेली वर्ष प्रभागात मेहनत घेऊनही रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाच्या पदाचे राजीनामा दिले आहेत. भाजपचे रत्नागिरी शहर सरचिटणीस नीलेश आखाडे आणि बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका प्राजक्ता रूमडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोघेही अपक्ष रिंगणात आहेत.
भाजपच्या काही उमेदवारांना शिंदेगटात पाठवून उमेदवारी देण्यात आली मात्र प्रभागात पाच वर्ष काम करूनही भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्राजक्ता रूमडे नाराज झाल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्र.६ मधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचे शहर सरचिटणीस नीलेश आखाडे हे प्रभाग क्र.७ मधून इच्छुक होते.ती जागा शिंदे गटाला सोडण्यात आल्याने नीलेश आखाडे नाराज झाले.त्यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आज नीलेश आखाडे यांनी शहर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Nov 2025 22:06:51
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांचं स्वतःच्या आरोग्यावर जराही लक्ष नसतं… कामाचा ताण, इतर तणाव अनेक गोष्टींमुळे व्यक्ती सतत चिंतेत असतो. एवढंच...
Comment List