मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कांदिवलीतील चारकोप एका बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीमा भाई आपल्या कारमध्ये बसलेला असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या त्याच्या पोटात लागल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. जखमी दिलीमा भाईला तात्काळ बोरिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. चारकोप पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा केले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू...
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले सत्य