स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून वाद, सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून वाद, सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणावरून झालेला वाद अद्याप कायम आहे. या संदर्भातील महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता हवी म्हणून सुनावणी पुढील मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तोपर्यंत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा केली जाणार नाही.

या प्रकरणी सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. न्यायालयाने हा विषय निवडणूक प्रक्रियेवर थेट परिणाम करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण लागू केल्याचा आरोप अद्याप प्रलंबित असून, कोर्ट हा मुद्दा गंभीरतेने हाताळत आहे. राज्य सरकारने न्यायालयाला कळवले की महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, कारण आरक्षणाचे निकष आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

यापूर्वी 17 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले होते की 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका रोखू असा इशारा कोर्टाने दिला होता. बांठिया आयोगाची वैधता नंतर तपासू, मात्र निवडणूक प्रक्रिया थांबता कामा नये, असा निर्देश दिला होता. केंद्र सरकारचे कायदेशीर प्रतिनिधी तुषार मेहता यांनी अतिरिक्त वेळ मागितल्यावरही कोर्टाने असमाधान व्यक्त केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nanded News  भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी
>> विजय जोशी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षात घराणेशाही चालत नाही असे छातीठोकपणे जाहीरपणे सांगतात, मात्र नांदेड...
जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?
तैवानवर लष्करी कारवाई केली तर आम्ही…; जपानचा चीनला थेट इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून वाद, सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब
पुण्यात हॉटेल कपिलाजवळ स्लॅब कोसळला, दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ‘हॉक फोर्स’चे इन्स्पेक्टर शहीद
मतचोरी तर सोडाच पक्षाचे बी फॉर्मसुद्धा चोरले, शिवसेनेचा हल्लाबोल; डमी उमेदवार आणि राहतामधील अर्जांचा निवडणूक आयोगाचा घोळ आणला चव्हाट्यावर