पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार

पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार

बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रया सुरू झाल्यापासून राज्याच्या विविध भागांमधून मृत्यूच्या बातम्या येत आहेत. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या X हँडलवरून निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. एसआयआर सुरू झाल्यापासून २८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आयोगाचा अनियोजित निर्णय यासाठी जबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील शांती मुनी एक्का नावाच्या बूथ-लेव्हल ऑफिसरच्या (बीएलओ) आत्महत्येचा उल्लेख करून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआरचा तीव्र विरोध केला. त्यांनी या कारवाईमागील असह्य दबावाचा उल्लेख केला. पुढील जीवितहानी टाळण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे.

X वर पोस्ट करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “निवडणूक आयोगाने बीएलओंवर दबाव आणला असून तीन वर्षे लागणारे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले आहे.असा अमानुष दबाव कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायकच नाही तर लोकशाही प्रक्रियेसाठीही चिंताजनक आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू...
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले सत्य